[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
![प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
नियमित रूपात कोथिंबीरचे पाणी पिण्यामुळे शरीराला विटामिन सी प्राप्त होते. कोथिंबीरच्या पाण्यामुळे प्रतिकाशक्ती बुस्ट होते आणि आजारपणापासून माणूस अधिक दूर राहतो. एक ग्लास कोथिंबीरचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता.
कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
शरीरातून विषारी पदार्थ बाहेर
![शरीरातून विषारी पदार्थ बाहेर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
शरीरामध्ये अनेक विषारी पदार्थ बाहेर जात नाहीत आणि त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. मात्र तुम्हाला किडनीतील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढायचे असतील तर कोथिंबीरचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही रोज कोथिंबीर डिटॉक्स वॉटर पिऊ शकता.
(वाचा – ५ आजार करेल छूमंतर ही काळी बी, पोषक तत्वांनी भरलेल्या Kalonji चे किती आणि कसे करावे सेवन)
वजन कमी करण्यासाठी
![वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर कोथिंबीरचे अथवा धण्याचे पाणी यासाठी उपयुक्त ठरू शकते. मेटाबॉलिजम बुस्ट होण्यासाठी याची मदत होते आणि शरीरातील चयापचय वाढवून चरबी जाळण्यासाठी याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा धण्याचे पाणी अथवा कोथिंबीरचे पाणी तुम्ही प्यायल्यास, त्वरीत वजन कमी झाल्याचे तुम्हाला कळेल.
(वाचा – थुलथुलीत पोट-मांडीवरील चरबी गायब करण्यासाठी खा केवळ या भाजी, त्वरीत होईल वजन कमी)
पचनक्रियेसाठी उपयुक्त
![पचनक्रियेसाठी उपयुक्त पचनक्रियेसाठी उपयुक्त](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
पचनक्रिया नीट नसेल तर वजनवाढ त्वरीत होते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राखण्यासाठी कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन करावे. गॅस, पोट फुगणे आणि चिडचिड होत असेल तर कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन हे उपयुक्त ठरते. कोथिंबीर, काकडी, नारळाचे दूध असे एकत्र करून तुम्ही स्मूदीही तयार करून यासाठी पिऊ शकता. सकाळी उपाशीपोटी कोथिंबीर पाणी पिण्याने पोटात गॅस निर्माण होत नाही.
(वाचा – ३० दिवसात १ पदार्थाने वितळेल पोटावरील चरबी, कसे कराल सेवन आणि व्हाल सडपातळ)
त्वचेच्या समस्या होत नाहीत
![त्वचेच्या समस्या होत नाहीत त्वचेच्या समस्या होत नाहीत](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
कोथिंबीरमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स गुणांमुळे त्वचेच्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते. चेहऱ्यावरील मुरूमं, काळे डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे त्वचेवर येणारे रॅश अथवा डोळ्यांवर येणारी खाज निघून जाण्यास मदत होते. कोथिंबीर अथवा कोथिंबीरच्या बियांमध्ये बॅक्टेरिया रोखण्याचे गुण असून त्वचेच्या विकारांपासून हे वाचवतात.
मासिक पाळीसाठी उपयुक्त
![मासिक पाळीसाठी उपयुक्त मासिक पाळीसाठी उपयुक्त](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास अधिक होतो. त्यांनी कोथिंबीरचे पाणी उकळून प्यावे अथवा धण्याचे पाणी प्यावे. कोथिंबीरमध्ये असलेल्या लोहामुळे रक्ताची कमतरता पूर्ण होते आणि शरीरातील क्रॅम्पिंग कमी करून मासिक पाळीच्या दिवसात होणारा त्रास कमी होतो. तसंच हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठीही याची मदत मिळते.
संदर्भ
https://www.webmd.com/diet/health-benefits-coriander
https://pharmeasy.in/blog/ayurveda-uses-benefits-side-effects-of-dhania-cilantro-coriander-leaves/
https://www.thebetterindia.com/299929/health-benefits-of-dhania-coriander-water-recipe-food-science/
[ad_2]