[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हळद
![हळद हळद](https://static.langimg.com/thumb/101697830/maharashtra-times-101697830.jpg?width=680&resizemode=3)
हळदीमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. हळदीमध्ये कर्क्युमिन असते. हे एक संयुग असून दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हळद अँटी-व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल आहे. जे विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.
(वाचा – श्रीश्री रवीशंकर यांनी सांगितलेले अल्कलाइन पाणी म्हणजे काय? लठ्ठपणा ते कोलेस्ट्रॉल, सगळेच आजार राहतील आटोक्यात)
डाळिंब
![डाळिंब डाळिंब](https://static.langimg.com/thumb/101697770/maharashtra-times-101697770.jpg?width=680&resizemode=3)
डाळिंबाचे दाण्यांमध्ये अतिशय महत्वाचे गुणधर्म आहेत. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटामिन सी-ए यासारखे पोषकतत्व भरपूर प्रमाणात आहेत. ज्याचा फायदा अधिक होतो.
(वाचा – मधुमेह-बीपीच्या रूग्णांनी सकाळी खावेत ६ पदार्थ, Diabetes-Blood Pressure एकदम राहील कंट्रोलमध्ये)
आलं
![आलं आलं](https://static.langimg.com/thumb/101697666/maharashtra-times-101697666.jpg?width=680&resizemode=3)
आलं हे शक्तिशाली रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांपैकी आहे. जिंजरॉल एक बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे. ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक विरोधी पदार्थ आहेत. यामुळे पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून आराम मिळतो.
(वाचा – पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाजीत नॉनव्हेजपेक्षाही ५० टक्के जास्त प्रोटीन, शरीर बनेल टणक आणि मजबूत)
बीट
![बीट बीट](https://static.langimg.com/thumb/101697588/maharashtra-times-101697588.jpg?width=680&resizemode=3)
बीट हे व्हिटॅमिनयुक्त पदार्थ आहे. यामध्ये सी व्हिटॅमिन, फोलेट, फायबर, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक आहेत. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पावसाळ्यात बीट, बीटाचा ज्यूस किंवा कोशिंबिरीचे सेवन करा.
(वाचा – Shravan 2023 : श्रावण महिन्यात या कारणांमुळे करू नये मांसाहार, आयुर्वेदिक आणि शास्त्रीय कारण महत्वाचं)
सॅट्रिक पदार्थ
![सॅट्रिक पदार्थ सॅट्रिक पदार्थ](https://static.langimg.com/thumb/101697384/maharashtra-times-101697384.jpg?width=680&resizemode=3)
मोसंबी, लिंबू, द्राक्ष आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीस हे महत्वाचे आहे. या पदार्थांमुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.
(वाचा – काय आहे Guillain-Barre syndrome? ज्यामुळे लोक होतात पॅरालाइज, पेरुमध्ये जाहीर केली हेल्थ इमर्जन्सी)
दही
![दही दही](https://static.langimg.com/thumb/101697277/maharashtra-times-101697277.jpg?width=680&resizemode=3)
प्रोबायोटिक्स पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. पावसाळ्यातील आहारात दह्याचा समावेश करावा ज्यामुळे संसर्गाशी दोन हात करणे सोपे होणार आहे.
(वाचा – आतड्यांतील पीळ काढून सडलेली घाण बाहेर काढेल हा काळा पदार्थ, बाबा रामदेव यांच्या टिप्सने शौचाला होईल अगदी साफ)
अंडी
![अंडी अंडी](https://static.langimg.com/thumb/101697220/maharashtra-times-101697220.jpg?width=680&resizemode=3)
अंड्यांचा आहारात समावेश केल्याने त्वचेशी संबंधीत आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. पावसाळ्यात अंडी आवर्जून खावीत.
(वाचा – नसांमधील LDL Cholesterol कमी करण्यासाठी प्यायलाच हवेत २ हर्बल टी, डायबिटिसही राहील कंट्रोलमध्ये)
पालक
![पालक पालक](https://static.langimg.com/thumb/101697156/maharashtra-times-101697156.jpg?width=680&resizemode=3)
पावसाळ्यात पालेभाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण पालकामध्ये सर्वाधिक पोषकतत्व असल्यामुळे याचा आहारात समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]