[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आत्महत्या का केली जाते
![आत्महत्या का केली जाते आत्महत्या का केली जाते](https://static.langimg.com/thumb/102337963/maharashtra-times-102337963.jpg?width=680&resizemode=3)
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार साधारण १५ ते १९ या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं. मात्र देशात आणि जगात अशा अनेक व्यक्ती आत्महत्या करतात ज्यांना नक्की आत्महत्या का करावी वाटते आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे नेहमीच सर्वांना आश्चर्य वाटतं.
आत्महत्येमागे नैराश्य आणि जीवन व्यर्थ असून काहीही न करता येण्याची भावना मनात बळावत जाते असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. मात्र या विचारापासून फारकत नक्कीच घेता येते असंही त्यांनी सांगितलं.
अनेक घटना ठरतात कारणीभूत
![अनेक घटना ठरतात कारणीभूत अनेक घटना ठरतात कारणीभूत](https://static.langimg.com/thumb/102337961/maharashtra-times-102337961.jpg?width=680&resizemode=3)
आत्महत्या हा त्वरीत घेतलेला निर्णय नसतो. त्यामागे अनेक घटनांची साखळी असते. आता आपल्या आयुष्यात काहीही शिल्लक नाही असं सतत मनात वाटत राहणं आणि त्यानंतर ही अवस्था इतकी वाईट होणं की आत्महत्या करणं हेच एखाद्या व्यक्तीला योग्य वाटू शकते. चांगल्या विचारांपेक्षा वाईट गोष्टींचा विचार आणि स्वतःला संपविण्याचा विचार अधिक केला जातो.
(वाचा – सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे)
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या
![नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या](https://static.langimg.com/thumb/102337958/maharashtra-times-102337958.jpg?width=680&resizemode=3)
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असं सहसा अभ्यासातही म्हटलं जातं. कारण नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीच आत्महत्या करणाऱ्या अधिक असतात हे अभ्यासतही सिद्ध झाले आहे. नैराश्यात असणारी माणसं ही जगाकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने पाहतात आणि त्यामुळे त्यांना जगण्यात काहीच अर्थ वाटत नाही आणि त्यांना आत्महत्या हाच एक पर्याय दिसतो असं डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केलं.
(वाचा – तुमच्याही हाडाची काडं होत आहेत का? कमकुवत हाडांसाठी समाविष्ट करून घ्या Vitamin D युक्त पदार्थ)
आत्महत्या करणाऱ्या माणसांमधील जाणवणारी लक्षणे
![आत्महत्या करणाऱ्या माणसांमधील जाणवणारी लक्षणे आत्महत्या करणाऱ्या माणसांमधील जाणवणारी लक्षणे](https://static.langimg.com/thumb/102337957/maharashtra-times-102337957.jpg?width=680&resizemode=3)
तज्ज्ञांनी दिलेल्या मतानुसार, अचानक ही व्यक्ती सर्व लोकांपासून दूर राहू लागते. स्वतःच्या नादात असणे अथवा दारू, सिगारेटचा आधार घेणे सुरू होते. तसंच सतत निराशावादी विचार व्यक्त करणे आणि मृत्यूबाबत बोलणे हे अशा व्यक्तींच्या बोलण्यातून अधिक जाणवते. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये ही लक्षणं दिसू लागली तर त्वरीत त्यांच्यासह अधिक वेळ घालवायला सुरूवात करा.
(वाचा – काळं लिंबू कधी पाहिलंय का? ब्लॅक लेमनच्या चहाने मिळतात शरीराला अफलातून फायदे)
आत्महत्येच्या विचारापासून कसे दूर जावे
![आत्महत्येच्या विचारापासून कसे दूर जावे आत्महत्येच्या विचारापासून कसे दूर जावे](https://static.langimg.com/thumb/102337956/maharashtra-times-102337956.jpg?width=680&resizemode=3)
जेव्हा आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक आणि आत्महत्येचे विचार येऊ लागतात तेव्हा हा विचार अगदी काही क्षणांचा असतो. मात्र हे विचार कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मानसिका आजाराकडे आजही दुर्लक्ष करण्यात येते. मात्र असे अजिबात करू नये. मोकळेपणाने बोलावे आणि वेळीच समुपदेशन केंद्रात जावे, जेणेकरून जीव वाचविण्यास मदत मिळते.
[ad_2]