( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharmishtha Mukherjee : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन लैगिंक छळासारखे गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. असंच एक प्रकरण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यासोबतही घडलं आहे. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधी यांचे समर्थक त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत, असा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधींना खुले पत्र लिहिले आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसच्या एका जवळच्या सहकाऱ्यावर ऑनलाईन लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेस आणि…
Read MoreTag: महणलय
भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर….
( प्रगत भारत । pragatbharat.com) Meenakshi Lekhi : वारंवार विनंती करूनही ‘भारत माता की जय’चा न म्हटल्याने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केरळमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे झालेल्या युवा परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देत नसल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांवर केंद्रीय मंत्री लेखी संतापल्या. त्यांनी एका मुलीला घोषणा देत नसल्यामुळे रागाने बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी मिनाक्षी लेखी यांनी भारत तुमची माता नाही का असा सवाल देखील विचारला. या घटनेची आता देशभराता चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी…
Read MoreINDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, ‘देशात काय..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदामुळे ममता बॅनर्जींनी किमान पश्चिम बंगालमध्ये तरी आपण एकटेच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र ममता यांचा हा ‘एकला चलो रे’चा नारा ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपासंदर्भात आपली काँग्रेसबरोबर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट करताना मी राज्यात एकटीच लढणार हे आधीपासूनच म्हणत होते, असं विधान केलं आहे. ममता नक्की…
Read More‘आठवड्यातून 70 तास काम’, पती नारायण मूर्तींच्या ‘त्या’ विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या ‘मग सुट्टी काय…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, “मीदेखील या वयात 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम सुट्टीवर असल्याप्रमाणे…
Read More‘प्राध्यापकाने आमच्या गुप्तांगाला हात लावला’, 500 विद्यार्थिनींनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाल्या…
( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे. पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी…
Read Moreनारायण मूर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्याची सुधा मूर्तींनी केली पाठराखण, स्पष्टच म्हणाल्या…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Narayana Murthy News: नारायण मूर्ती यांनी केलेले वक्तव्य अलीकडेच चर्चेत आले आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला होता
Read Moreमोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi On Women Reservation Bill: ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकावर आज संसदेमध्ये चर्चा झाली. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सकाळी 11 च्या सुमारास चर्चेला सुरुवात केली. यानंतर काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या विधेयकला आपला पाठिंबा असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. या विधेयकाच्या माध्यमातून माझे पती आणि माजी मुख्यमंत्री राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही सोनिया गांधींनी एक जुना संदर्भ देत…
Read Moreराकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, ‘त्या चंद्रावर गेल्या तेव्हा…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी चुकून चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांचं नाव घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एक गोंधळ घातला आहे. सोमवारी त्यांनी एक गोंधळात टाकणारं विधान केलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चंद्रावर गेल्या होत्या असं ममता यांनी म्हटलं आहे. इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात झालेल्या भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची आठवण करताना ममता बॅनर्जींना, “जेव्हा इंदिरा गांधी चंद्रावर पोहोचल्या तेव्हा त्यांनी राकेश यांना विचारलं की तिथून हिंदुस्तान (भारत) कसा दिसतो असं विचारलं त्यावेळी त्यांनी,…
Read Moreतुम्ही मित्राच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? प्रश्न ऐकून स्मृती इराणी संतापल्या, म्हणाल्या…
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) चाहत्यांसह संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांना त्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी दिली. या चर्चेदरम्यान स्मृती इराणी यांनी झुबिन इराणी यांच्यासोबतचा विवाह आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मोना यांच्याबद्दलही भाष्य केलं. दरम्यान या ‘Ask Me Anything’ सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती इराणी प्रचंड संतापल्या. त्यांनी उगाच मोना यांची बदनामी करु नका सांगत आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली. एका चाहत्याने स्मृती इराणी यांनी तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं आहे का? असा प्रश्न विचारला. स्मृती इराणी…
Read More‘फ्लाइंग किस’वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; खासदारांना म्हणाल्या ‘मणिपूरच्या महिलांना काय वाटलं असेल?’
( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन केंद्रावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपल्यानंतर ‘फ्लाइंग किस’ दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांना घेरलं असून, महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रच लिहिलं आहे. यादरम्यान एका महिला आयएएस अधिकाऱ्याने या वादावर भाष्य केलं आहे. राहुल गांधींनी वर्तन अशोभनीय असल्याचं सांगत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सोपवलं…
Read More